परिचय

गावा विषयी

ग्रामपंचायत अनाळा (Anala) हे महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात वसलेले एक शांत, सामाजिकदृष्ट्या सुसंस्कृत आणि विकासाभिमुख गाव आहे. ग्रामविकास, स्वच्छता, पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांवर सातत्याने दिला जाणारा भर यामुळे अनाळाने परिसरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
अनाळा गाव तालुका मुख्यालय परंडा पासून सुमारे 20 कि.मी. अंतरावर तर जिल्हा मुख्यालय धाराशिवपासून सुमारे 80 कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाला परंडा, शहराशी चांगली दळणवळण सुविधा उपलब्ध असून जवळच्या गावांशी रस्तेमार्गाने सहज संपर्क साधता येतो. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, शेती व दैनंदिन आर्थिक व्यवहारांसाठी गावाचा शहरी भागाशी घनिष्ठ संबंध निर्माण झाला आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार अनाळा गावाची एकूण लोकसंख्या 2798 असून सुमारे 650 कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. गावाची प्रमुख भाषा मराठी असून सामाजिक सलोखा, आपुलकी आणि लोकसहभाग ही गावाची खरी ताकद आहे. साक्षरतेच्या क्षेत्रात गाव सातत्याने प्रगती करत असून शिक्षण व सामाजिक विकासाबाबत ग्रामपंचायत व ग्रामस्थ कटिबद्ध आहेत.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत अनाळा मार्फत अनेक लोकाभिमुख व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. सार्वजनिक स्वच्छता, ग्रामसभा आयोजन, महिला बचत गट प्रशिक्षण, ग्रामदरबार उपक्रम, लसीकरण मोहीम तसेच प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलांचे वितरण यामुळे नागरिकांना शासकीय सुविधा पारदर्शक व वेळेवर उपलब्ध होत आहेत.
स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गावात घंटागाडीच्या माध्यमातून ओला व सुका कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक व धार्मिक स्थळांची नियमित स्वच्छता तसेच हिरवळीचे जतन यावर भर देण्यात येत आहे. मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे, बस थांबा निवारा शेड आणि नागरिकांसाठी बसण्याची सोय या सुविधांमुळे ग्रामस्थांचे जीवनमान उंचावले आहे.
एकूणच, अनाळा हे गाव लोकसहभाग, शिस्तबद्ध प्रशासन, स्वच्छता, सामाजिक एकोपा आणि सातत्यपूर्ण विकास यांचे उत्तम उदाहरण असून भविष्यातही आदर्श व प्रगत ग्रामपंचायत म्हणून वाटचाल करत राहील.
हे राज्यमार्गावरील चौफुलीवर चं गावं आठवडी बाजार जागृत देवस्थान श्री कालिका देवी मंदिर तालुक्याच्या नंतर 22 गावांना रेशनिंग पुरवठा होतो सुसज्ज ,जि प शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना व विशेष म्हणजे तालुक्यातील एकमेव गावं आसं आहे की गावांमध्ये प्रत्येक घरापर्यंत चार चाकी गाडी पोहोचु शकते आसी गावातार्गत रस्ते गेल्या पाच वर्षांत टॅकर मुक्त गावं.
लोकसंख्या
0
कुटुंबसंख्या
0
भौगोलिक क्षेत्र फळ
0

कार्यपद्धती

ग्रामविकास विभाग राज्य स्तरावर मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे विविध योजना अंमलात आणल्या जातात. ग्रामीण भागातील विकासासाठी शासनाच्या विविध योजना आणि कार्यक्रम प्रभावीपणे राबवले जातात.

उद्दिष्टे

  • स्वच्छ, सुंदर आणि हरित गावांची निर्मिती करणे
  • गरिबी निर्मूलनासाठी विविध योजना राबवणे
  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत निवास सुविधा उपलब्ध करून देणे
  • पंचायत राज व्यवस्थेला सक्षम व पारदर्शक बनवणे
  • लोकप्रतिनिधींना प्रशिक्षणाद्वारे सक्षम करणे
  • ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधणे
  • लोकसंख्याशास्त्रीय प्रोफाइल

    Updated on : 1 year - 1 mon - 30 days ago

    3

    Total Area (in sq. km)
    Updated on : 1 year - 1 mon - 30 days ago

    1471

    Male

    1327

    Female

    2798

    Total
    Updated on : 1 year - 1 mon - 30 days ago

    325

    ST

    31

    SC

    1221

    OBC
    Updated on : 1 year - 1 mon - 30 days ago

    503

    Children (0-6yrs)

    408

    Children (6-18yrs)

    दृष्टी आणि ध्येय

    दृष्टी

    स्वच्छ, सुंदर, विकसित आणि आत्मनिर्भर गावांची निर्मिती करणे.

    ध्येय

  • ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे
  • गरिबी निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे
  • सर्वांना निवास व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे
  • पंचायत राज व्यवस्थेला अधिक मजबूत करणे
  • Scroll to Top